Pearl Farming करून वर्षाला लाखों रुपये कामवणारा विनोद यादव

by Geeta P
423 views
Pearl Farming

Pearl Farming करून आज भारतीय लोक लाखों रुपये कमाई करत आहेत.

मोत्याची चमक आणि त्याची घडण बघून सगळेच जण आकर्षित होतात. मोती बघितला की सर्वानाच तो हवा असतो.

पण तुम्हाला माहीत आहे का मोत्यानची शेती करण्यासाठी आवश्यक असणारे इंफ्रास्ट्रचर लावण्यासाठी जवळजवळ ४०,००० रुपयांचा खर्च येतो.

जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री, Tallest Model Of the World

शेती करण्याची पद्धत

त्यासाठी Pearl Farming आठ ते दहा महिने शेती करावी लागते. मोती हे नैसर्गिक रित्या एका शिंपल्यामध्ये कोमल टीश्यू मध्ये तयार होतात. परंतु अशीच कृत्रिम वातावरण निर्मिती करून प्रकिया करून मोत्यांची निर्मिती करता येते. 

मछिमाऱ्यान कडून असेच काही शिंपले विकत आणून त्यातले टीश्यू क्राफ्ट बाजूला काडून ते दुसऱ्या शिंपल्यात टाकले जातता.

असे केल्याने त्यामध्ये मोत्यांचा पिशवीची निर्मिती होते त्यामध्ये मोती टीश्यू कॅल्शियम कार्बोनेट चा रूपात जमतात. या प्रक्रियेला पर्ल कल्चरिंग असे म्हणतात. 

हा व्यवसाय जग भरात खूप नावा रूपाला आलेला आहे.  या व्यवसायात खूप नफा आहे

Pearl Farming मोत्यांची शेती करणारा इंजिनिअर

आज आपन अशाच एका मूला बद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या घराच्या मागचा बाजूला मोत्यांची शेती बनवली. हे एकूण तुम्हाला आशचर्य वाटेल पण हे खरे आहे.

हरिद्वार मधील गुरुग्राम येथे विनोद यादव या मुलाने आपल्या  घराच्या मागे मोत्यांची शेती केली आहे.

त्याने आपल्या घराच्या मागच्या मोकळ्या पडलेल्या जागे मध्ये एक कृत्रिम तलाव निर्माण केला आहे.

आणि त्याने आपल्या ग्रहनगर जमालपुर येथील दीड एकर जमिनी मध्ये त्याने मोत्यांची शेती केली आहे. 

असे म्हणतात की अशा सॅटॅलाइट सिटीमध्ये मोत्यांची शेती करणारा तो एकमेव शेतकरी आहे.

पेशाने इंजिनिअर असणाऱ्या विनोद ने आधी २० बाय २० फुट तलावात मच्छी पालन करण्याचे ठरवले होते.

त्यासाठी या बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तो आपले काका सुरेश कुमार यांच्या सोबत जिल्ह्यातील इतर मत्स्य विभागात जाऊन देखील आला होता.

परंतु दुर्दैवाने त्याला मिळालेल्या या जमिनीच्या तुकड्यावर युनिटी लावण्याच्या परेशानी मुळे त्याला आपला निर्णय बदलावा लागला.

यानंतर त्याने त्यांच्या गावातील अधिकारी धर्मेन्द्र सिंग यांच्या सांगण्यावरून मोत्याची शेती करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी एक महिन्याच्या ट्रेनिंगला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर aqwa कल्चर भुवनेश्वर येथे गेला होता. 

आणि नंतर त्याने या व्यवसायाला सुरुवात केली.

आज तो या व्यवसाय मधून वर्षाला चार लाखांपेक्षा अधिक नफा कमावतो. या व्यवसायाकडे गावातील इतर लोकही आकर्षित होत आहेत. 

तेथील अधिकारी धर्मेंद्र सिंग असे सांगतात की गुरु ग्राम हा पहिला जिल्हा असेल जिथे मोत्यांची शेती केली जाते.  हे पाहून इतर लोकही या शेतीकडे वळण्याचा विचार करत आहे. 

तसेच विनोद चे या शेती करणार्‍याला सांगणे आहे की

Pearl Farming साठी मत्स्य विभागा कडून या शेती करणाऱ्यांसाठी सबसिडी ही मिळते.

विनोद यादव

हा व्यवसाय करून तो आर्थिकृष्ट्या खूप सशक्त बनला आहे. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment