Ashwathama Alive अश्वत्थामा आजही जीवंत आहे, तो भटकत आहे .

962 views
Ashwathama Alive

आज मी आपल्याला एका अशा पत्राबद्दल सांगणार आहे ते पात्र महाभारतातील आहे. त्या पात्राचं नाव आहे अश्वत्थामा, म्हणतात अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो सर्वत्र भटकत आहे. Ashwathama Alive

महाभारतामध्ये आपण श्रीकृष्णाचि  हुशारी,  अर्जुनाची शूरता, कर्णचा दानशूरपणा, भिमाचे बळ हे खूप ऐकून आहोत.

बऱ्याच महाभारतावर आधारित मालिकांमधून याचा इतिहास उलघडला ही आहे . पण अश्वत्थामा चा जास्त उल्लेख महाभारतामध्ये केला जातो कारणही तसेच आहे.

अश्वत्थामा सुद्धा महाभारतातील मुख्य पात्र मधला एक होता त्याच्या अस्तित्व आजही आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते सत्य आहे आहे.

या बद्दल थोडस आज आम्ही या लेखातून आपणास सांगणार आहोत

महाभारतामध्ये आपल्या पिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी अश्वत्थामा निघाला होता.

परंतु ही चूक त्याला खूप महागात पडली आणि चिडलेल्या भगवान श्रीकृष्णाने त्याला एक शाप दिला तो म्हणजे अमरत्वाचा

असं म्हटलं गेलं आहे हो युगानुयुगे भटकत राहील. म्हणून आजही अश्वत्थामा पाच हजार वर्षांपासून भटकत आहे.

Ashwathama Alive

असे मानले जाते की मध्यप्रदेशच्या बुरहानपूर किल्ल्याच्या शिव मंदिरामध्ये अश्वत्थामा सर्वात अगोदर येतो आणि पूजा करतो.

कारण रोज सकाळी आणि ताजी फुले शिवलिंगावर पडलेल्या दिसतात हे खूप मोठे रहस्य आहे. 

आठ मुले गंगा नदीत विसर्जित करणारी देवी..

अश्वत्थामा कोण होता?

महाभारतानुसार गुरु द्रोणाचार्य जे की  कौरव आणि पांडवांचे गुरू होते.आणि त्यांचाच मुलगा अश्वत्थामा होता, पण युद्धामध्ये गुरु द्रोणाचार्य हस्तिनापूरच्या  निष्ठेमुळे  ते कौरवांकडुन लढले.

अश्वत्थामा देखील आपल्या  पित्याप्रमाणे सर्व शस्त्र विद्या मध्ये निपून होता.
त्याने युद्धामध्ये पांडवांचे सैन्य खूप मारले. पांडव सैन्याचा होत असलेला ऱ्हास बघून श्रीकृष्णाने युधिष्ठिराला गुरू द्रोनाचाऱ्या ला कूट नीतीने मारण्याचे आवाहन केले.

युद्धामध्ये पांडवांनी अश्वत्थामा मारला गेला अशी गोष्ट पसरवण्यात आली. 

हे ऐकून गुरु द्रोणाचार्य पुत्राच्या विरहात आपले शस्त्र त्याग केले आणि खाली  बसले आणि याच संधीचा फायदा घेऊन राजा द्रुपदच्या पुत्राने गुरु द्रोणाचार्य चा वध केला.

त्याच्या मृत्यूमुळे अश्वत्थामा खूप विचलित झाला आणि त्याचा प्रतिशोध म्हणून पांडव पुत्रांना मारले .

आणि हे पाहून श्रीकृष्णाने अश्वत्थामा ला शाप दिला की युगानुयुगे तू भटकत राहशील,आणि याच कारणामुळे अश्वत्थामा आजही ही भटकत आहे.

हे तितकेच खरे आहे आणि तो आही भटकत आहे.. मोक्ष मिळण्याच्या आशेने.

Related Posts

Leave a Comment